ज्येष्ठागौरीची कहाणी Jyeshtha Gouri Kahani

 ज्येष्ठागौरीची कहाणी Jyeshtha Gouri Kahani

Jyeshtha-Gouri-Kahani
Jyeshtha-Gouri-Kahani


 

एक आपलं आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब असा ब्राह्मण रहात असे. एके दिवशी काय झालं ? भाद्रपद महिना म आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दिसू घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलीनं पाहिलं. मुलगी घरी आली. आईला सांगू लागली, आई, आई, आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळ गौरी आणून काय करू ? तिची पूजापत्री केली पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तस्तलीजवळ बाजारातलं सामान आणावयास सांग. सामान आणलं म्हणजे गौर आणीन.

 मुलगी तेथून उठली, बापाकडं आली. बाबा, बाबा, बाजारात जा, घावन घाटल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणील. बापानं घरात चौकशी केली, मुलांचा नाद ऐकला, मनात अतिशय दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवत नाही. गरिबीपुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं असं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळयाच्या पाळी गेला व जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली; जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण आहे म्हणून विचारलं.

 'ज्येष्ठागौरीची कहाणी Jyeshtha Gouri Kahani'

 ब्राह्मणानं तिला आपली हकीकत सांगितली; म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. ह्या पाहुण्याबाई कोण आणल्या आहेत म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी आणली आहे म्हणून सांगितलं. बायको घरात गेली. आंबिलीकरिता कण्या पाहू लागली तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. हिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवन्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळीजण आनंदानं निजली. 

 

 नमो पीएम किसान च्या लाभात अडथळे

सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारली, मुला, मुला, मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली. घावन घाटलं जेवायला कर, नाही म्हणू नको, रडे काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला. अगं, ऐकलंस का? आजीबाईला न्हाऊ घाल, माखू घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सगळा स्वयं- पाक केला. सर्वजण मुलाबाळांसुद्धा पोटभर जेवली.

 

म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी, आजी, मी दूध कोठून आणू ? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता ऊठ आणि तुला जितक्या गाई-म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई-म्हशींची नावं घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. मग त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई-म्हशींना हाका मारल्या. वासरांसुद्धा त्या धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई-म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढल. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आता पोचती कर.

 ब्राह्मण म्हणाला, आजी, तुमच्या कृपेनं मला सगळं प्राप्त झालं, आता तुम्हांला पोचत्या कशा करू ? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पड- णार नाही.. ज्येष्ठागौरी म्हणतात ती मीच. मला आता पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं, यास काही उपाय सांग. गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, फडताळात टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी पडणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. तेव्हा गौर प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितली की, भादव्याच्या महिन्यात तळयाच्या पाळी जावं, दोन खडे घरी आणावे, ऊन पाण्यानं धुवावे, ज्येष्ठा- गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी.

 

 दुसऱ्या दिवशी गोडे घावन करावे, तिसरे दिवशी खीर- पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णींची ओटी भरावी, नेसायला द्यावं. संध्याकाळी हळद-कुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे अक्षय सुख मिळेल, संतत, संपत मिळेल. ही साठा उत्तरांची कहाणी पाचां उत्तरी देवाच्या द्वारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.

 

कहाणी गोपद्मांची याला टच करा