कहाणी गोपद्मांची The story Gopadma

कहाणी गोपद्मांची The story Gopadma 

कहाणी-गोपद्मांची


ऐका गोपद्यांनो तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादिकांच्या सभा बसल्या आहेत. ताशा. वगैरे वाद्यं वाजत आहेत. रंभा नाच करताहेत. तो तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदंगाच्या फुटल्या. असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला की, करारे हाकारा, पिटारे डांगोरा, गावात कोणी वाणवशावाचून' असेल त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा.

 

 

 तंबोऱ्याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा, असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले, की माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिजकडं जाऊन चौकशी केली. तिनं काही वाणवसा केला नव्हता. नंतर कृष्णानं तिला वसा सांगितला. सुभद्रे, सुभद्रे, आखाडी दशमीपासून तीन गोपद्मे देवाच्या द्वारी काढावीत, तितकीच ब्राह्मणाच्या द्वारी, पिंपळाचे पारी, तळयाचे पाळी व गाईच्या गोठ्यात काढून पूजा करावी. हा वसा कार्तिकी दशमीस संपूर्ण करावा. याप्रमाणे पाच वर्षे करावे.

 

 

 उद्यापनाचे वेळी कुंवारणीस जेवावयास बोलवावी. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्यांचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी. पाचवे वर्षी चोळीपरकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं. असं सांगून श्रीकृष्ण पूर्वठिकाणी येऊन बसले. सुभद्रेनं लागलीच सांगितल्याप्रमाणं केलं. पुढं सभेत कळलं की, सुभद्रा वाणवशाशिवाय आहे. समजल्यावर तिकडे दूत जाऊन पाहातात तो हिनं वसा घेतला आहे. 

 

 

पुढं येता गावाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय त्यास दिसली. दक्षिणेस पाय व उत्तरेस डोकं करून निजली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढू नेला. नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या. मृदंगाच्या भेय वाजत्या केल्या. तशाच रंभा नाचत्या केल्या. जसं या व्रताच्या योगानं सुभद्रेचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळो. ही साठां उत्तरांची कहाणी पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

 

कहाणी गोपद्मांची "The story Gopadma"