दिव्यांच्या अवसेची कहाणी Divyachya Avsechi Kahani
ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला. आपल्या-वरचा प्रमाद टळला. इकड उंदरांनी विचार केला की, हा आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसन्या दिवशी हिची फजिती झाली. सासू व दिरांनी निंदा केली. परातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे की, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वतः ते लावावेत, खडी-साखरेच्या खडघानं त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा.
महालक्ष्मीची कहाणी
याप्रमाणं ही घरातून निघाल्यावर ते सारं बंद पडलं. पुढं ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. विथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत की कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं ? कशी कशी पूजा मिळाली. वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू ? यंदा मजसारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असावयाचा, माझा थाटमाट जास्ती व्हावयाजा. त्या मला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत.
इतकं म्हटल्यावर त्यास सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय ? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू ? मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ आपण स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे. तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा, म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू-सासऱ्यांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली, म्हणून मला असे दिवस आले. ती दर वर्षास माझी पूजा करीत असे जिथं असेल तिथं ती असो, असं म्हणून दिव्यानं आशीर्वाद दिला.
'दिव्यांच्या अवसेची कहाणी Divyachya Avsechi Kahani'
सदरहू घडलेला प्रकार राजानं श्रवण केली. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली. तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेणा पाठवून आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सान्या घरात मुखत्यारी दिली. ती सुखानं राज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
